वेगळीच मजा असते
खरे प्रेम करणार
कोणीतरी मिळण्याची,
पण भीती हि
असते त्या व्यक्तीला
गमावण्याची..
आयुष्यात भेटण्याची शक्यता नसतानाही
आपण प्रेम करून
बसतो,
आणि नंतर एकमेकांच्या
आठवणीत तो विरह
खूप रडवतो...
प्रेमाची तर अशी
व्याख्याच का असावी??
प्रेमात एखाद्याची अपेक्षाच का
ठेवावी??
प्रेमाची सुरवात तर खूप
सुंदर असते,
मग हेच प्रेम
शेवटी अश्रू का
ढाळते??
केलेच प्रेम तर ते
असे करावे,
कि एकमेकांच्या सुखासाठी पुरून
उरावे....
पण असे निस्वार्थ
प्रेम सगळ्यांनाच मिळत
नसते,
कारण त्यासाठी तसे नशीब
असावे लागते...
जे मने
तोडेल ते प्रेमच
कसे असेल??
निस्वार्थ मनाने प्रेम केले
तर आयुष्य खरच
खूप सुंदर दिसेल..
म्हणूनच कदाचित कुठेतरी आपल्यासाठीही
अबोल प्रेम असेल,
पण आपल्याला मिळवून गमावणे
मात्र त्या
प्रेमालाच पटत नसेल...!!
No comments:
Post a Comment